Category राजकारण

मालवणात मनसेच्या वतीने मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले

मालवण : कोकणातील गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालवण शाखेने सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविला. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज, २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आणि मालवण शहरातील मुख्य…

माजी खा. विनायक राऊतांवर मंत्री नितेश राणेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

२८ वर्षांची साथ सोडून निकटवर्तीय सचिन सावंतांसह ठाकरे सेनेचे अनेक शिलेदार भाजपमध्ये कणकवली : कणकवलीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे सेनेचे कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघांचे माजी विधानसभाप्रमुख सचिन सावंत यांनी २८ वर्षांची…

गॉगल काढा, डोळे उघडा; मग विकास दिसेल!

बाबी जोगींवर दीपक पाटकरांचा घणाघात; “नाहक टीका कराल तर जशास तसे उत्तर देऊ” भूमिगत वीजवाहिनीवरून श्रेयवादाचे राजकारण; “वस्तुस्थिती न पाहता आरोप करणे बंद करा” मालवण : मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडल्याचा आरोप करत नगरपरिषदेवर टीका करणारे उबाठा गटाचे शहरप्रमुख…

‘सेवा अभियानातून भाजप जनतेच्या दारी; अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठारांनी ऐकून घेतले नागरिकांचे प्रश्न

अलिबाग : नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अलिबाग येथे आयोजित जनसंपर्क उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण…

धिरेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर यांनी…

इन्सुलीत उद्या रंगणार रानभाजी महोत्सव; पाककला स्पर्धेत महिलांना आकर्षक बक्षिसांची मेजवानी!

सौ. वेदिकाताई परब यांच्याहस्ते होणार उदघाटन : आकर्षक बक्षीसांची लयलूट इन्सुली : रानभाज्यांची समृद्ध परंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराचा संदेश देणाऱ्या रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात…

राजस्थानच्या रणांगणात प्रमोद जठार; भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी

नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रमोद जठार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती; संघटनात्मक अनुभवाची पक्षश्रेष्ठींकडून दखल सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणातून आता राजस्थानच्या निवडणूक रणांगणात आमदार प्रमोद जठार यांची एंट्री झाली आहे. राजस्थानमधील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कोकण विभागाचे विधान परिषद…

‘गद्दारीचा कलंक’ म्हणताच निलेश राणेंचा वैभव नाईकांवर जोरदार हल्लाबोल!

‘हा तर २०२६ मधील सर्वात मोठा विनोद’; काँग्रेसपासून उबाठापर्यंतच्या राजकीय प्रवासावर राणेंची बोचरी टीका मालवण : “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही,” या माजी आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेचे आमदार…

दापोलीकरांच्या प्रश्नांना ‘सेवा अभियान’चा दिलासा; भाजपकडून समस्या सोडविण्यासाठी थेट पाठपुरावा

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी नागरिकांशी साधला संवाद; विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘सेवा अभियान’ उत्स्फूर्त प्रतिसादात…

भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडवणाऱ्यांनी वैभव नाईकांच्या नावाने राजकारण करू नये

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा विरोधकांना टोला मालवण : माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मंजूर करून आणलेले आणि मालवण शहरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले भूमिगत वीजवाहिन्यांचे काम अद्याप रखडले आहे. नगरपरिषद सत्ताधारी…

मालवणात मनसेचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर,…

रत्नागिरीत भाजपच्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रमोद जठार मैदानात

रत्नागिरी : नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या शासन दरबारी मांडून प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी भाजपकडून रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानांतर्गत…

error: Content is protected !!