Category सिंधुदुर्ग

धिरेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर यांनी…

इन्सुलीत उद्या रंगणार रानभाजी महोत्सव; पाककला स्पर्धेत महिलांना आकर्षक बक्षिसांची मेजवानी!

सौ. वेदिकाताई परब यांच्याहस्ते होणार उदघाटन : आकर्षक बक्षीसांची लयलूट इन्सुली : रानभाज्यांची समृद्ध परंपरा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि पौष्टिक आहाराचा संदेश देणाऱ्या रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात…

राजस्थानच्या रणांगणात प्रमोद जठार; भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी

नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रमोद जठार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती; संघटनात्मक अनुभवाची पक्षश्रेष्ठींकडून दखल सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणातून आता राजस्थानच्या निवडणूक रणांगणात आमदार प्रमोद जठार यांची एंट्री झाली आहे. राजस्थानमधील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कोकण विभागाचे विधान परिषद…

रस्त्यावर गुरे सोडणाऱ्यांनो सावधान ; मालवण नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये…!

मोकाट गुरांना लगाम घालण्यासाठी नगरपरिषदेची धडक मोहीम सुरु मालवण : शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या समस्येवर अखेर मालवण नगरपरिषदेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात…

‘गद्दारीचा कलंक’ म्हणताच निलेश राणेंचा वैभव नाईकांवर जोरदार हल्लाबोल!

‘हा तर २०२६ मधील सर्वात मोठा विनोद’; काँग्रेसपासून उबाठापर्यंतच्या राजकीय प्रवासावर राणेंची बोचरी टीका मालवण : “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही,” या माजी आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेचे आमदार…

चार पिढ्यांचा वारसा, १०८ वर्षांचा विश्वास; नेरुरकर ज्वेलर्सचा MACCIA कडून दिमाखदार गौरव

‘राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्स’च्या यशस्वी वाटचालीची दखल; उमेश नेरुरकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर सोन्याची झळाळी अनेकांकडे असते; मात्र विश्वासाची चमक पिढ्यान्‌पिढ्या टिकवणे हीच खरी कमाई! अशा विश्वासाच्या जोरावर तब्बल १०८ वर्षांचा सुवर्ण वारसा…

आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट; १८ वर्षांच्या प्रतीक्षेला मिळणार चालना

मंत्री नितेश राणे उद्या करणार प्रत्यक्ष पाहणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांचा घेणार आढावा देवगड : देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या रखडलेल्या विकासाला आता निर्णायक गती मिळणार आहे. तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली असून, मत्स्यव्यवसाय व बंदरे…

आचऱ्यात पुन्हा रंगणार नारळ लढवण्याचा थरार; २५ ऑगस्टला स्पर्धेचे पाचवे पर्व

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन आचरा : कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक आणि थरारक नारळ लढवणे या खेळाचा उत्साह पुन्हा एकदा आचऱ्यात अनुभवायला मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धेचे पाचवे पर्व मंगळवार, दि. २५ ऑगस्ट…

सावंतवाडीत २४ ऑगस्टला ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ

आ. प्रमोद जठार, संतोष साखरे स्वीकारणार निवेदने; रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सावंतवाडी : नागरिकांच्या प्रलंबित समस्या आणि विविध शासकीय कामांना गती देण्यासाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते…

भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडवणाऱ्यांनी वैभव नाईकांच्या नावाने राजकारण करू नये

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा विरोधकांना टोला मालवण : माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मंजूर करून आणलेले आणि मालवण शहरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले भूमिगत वीजवाहिन्यांचे काम अद्याप रखडले आहे. नगरपरिषद सत्ताधारी…

मालवणात मनसेचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर,…

विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर राहुल गांधी साधणार संवाद; सिंधुदुर्गातील ३६ विद्यार्थिनी पुण्यात होणार सहभागी

मालवण : विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी तसेच सामाजिक समानतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या भविष्यातील संधी, रोजगाराचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा…

error: Content is protected !!