आचरा येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : आचरा देऊळवाडी येथील राखी प्रसाद घाडी या ३३ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घराच्या मागील पडवीत नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ८.३०वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची खबर तिचा नवरा प्रसाद घाडी याने आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आचरा पोलिसांत प्रसाद घाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सकाळी कामावर गेल्यानंतर आपली पत्नी एकटीच मुलासमवेत घरी होती. मी कामावर असताना वाडीतील शेजाऱ्यांनी माझ्या घराचा दरवाजा बंद असून मुलगा बाहेर रडत असल्याचे कळविले. मी कामावरून घरी आलो असता घराला आतून कडी लावलेली होती. पडवीत मागच्या बाजूने छपरावर चढून आत प्रवेश केला असता माझी पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याचे त्यांनी फिर्यादीत सांगितले. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील दाखल झाले. या बाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल एस एस कांबळे करत आहेत. राखी यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू असा परिवार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!