… तर पीएम किसान लाभार्थ्यांना पुढचा लाभ मिळणार नाही !

मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिला इशारा ; लाभार्थ्यांना केलं हे आवाहन

मालवण : पीएम किसान लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास पुढचा लाभ मिळणार नाही. तरी या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे. ई केवायसी करण्याची ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत वाढवून ७ सप्टेंबर पर्यत वाढीव मुदत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

केवायसी करायला मोबाईल वरून तसेच महा ई सेवा केन्द्र, आपले सरकार केन्द्र, ग्रामपंचायत मध्ये सुविधा उपलब्ध आहे. ज्या लाभार्थी यांनी अद्याप ई केवायसी केलेले नाही. त्यांनी तसेच दुर्गम भागातील शेतकरी यांच्या पर्यंतही याबाबत माहिती पोहोचवून पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!