वृक्षमित्र लेखक प्रकाश काळे यांचे एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मालवण : प्रख्यात वृक्षमित्र लेखक प्रकाश काळे यांनी सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली. श्री. काळे यांनी सन २०१५ मध्ये या महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये नक्षत्रवनप्रमाणे वृक्षारोपण केले होते. “एक झाड देशासाठी” या उद्देशाने त्यांनी या महाविद्यालयात २६८ हून अधिक झाडे लावली होती. या झाडांच्या पाहणीनिमित्ताने त्यांनी येथे भेट देऊन वृक्ष संगोपनाचे कौतुक केले.

सुंदर पर्यावरण पशु-पक्षी यांच्यासह रममाण होण्याची आवड असणारे प्रकाश काळे यांनी सन २०१५ मध्ये या महाविद्यालयात दुर्मिळ अशा प्रकारची वनस्पतीची लागवड केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय एका निसर्गरम्य अशा सुंदर वातावरणात आहे. त्याचा तुम्ही अभ्यासासोबतच आनंद घ्या. असे सांगितले. विद्यार्थ्यांना ऑक्सिजनचे, निसर्गाचे महत्त्व पटवून दिले व या संदर्भात मार्गदर्शन केले.

त्यांनी ६५ कवींमध्ये पहिली सादर केलेली कविता “शाप” ही विद्यार्थ्यांसमोर सादर केली. ही कविता सादर करताना प्रकाश काळे सर भावूक झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आपल्या मनात वृक्षांविषयीचे महत्व तसेच त्यांच्या सजीवपणाची जाणीव निर्माण झाली. ते विद्यार्थ्यांना म्हणाले, वनस्पती झाड जगेल तर आपण जगणार आहोत. स्वतःच्या रक्षणासाठी झाडे लावा, असे ते म्हणाले.प्रकाश काळे यांना महाराष्ट्र वृक्ष भूषण, डायमंड ऑफ महाराष्ट्र इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. या कार्यक्रमास वनस्पती औषध संशोधक विनायक बापट, उदय पुरोहित, तसेच संस्थेचे विश्वस्त, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!