मालवण आगारातून उद्यापासून मालवण – मुंबई एसटी बस सुरू

मालवण – रत्नागिरी बसच्या वेळेत बदल

मालवण : मालवण एसटी आगारातून गेले काही महिने बंद असलेली मालवण – मुंबई बसफेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मालवण आगारातून ही बस सकाळी ८ वाजता सुटणार आहे. तर मुंबई येथून पहाटे ४ वाजता मुंबई- मालवण अशी बस फेरी रविवारी २० मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, मालवण आगारातून सकाळी ८. ३० वाजता सुटणारी मालवण – रत्नागिरी बसफेरी सकाळी ६ वाजता सुटणार आहे. तरी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!