… ही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शरमेची बाब : आ. वैभव नाईकांचे टीकास्त्र

भविष्यात जिल्ह्यात यापुढे अनुचित घटना टाळण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

कुणाल मांजरेकर

मालवण : एखादा आमदार जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारावर हल्ला करतो, त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करतो, ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे. मात्र कायदा सर्वांना समान असतो तो कोणालाही सोडत नाही, हे कालच्या नितेश राणे यांच्या अटकेमुळे सिद्ध झाले आहे. यापुढे सिंधुदुर्गात संतोष परब हल्ला प्रकरणा सारखी घटना घडू नये आणि प्रत्येक निवडणुका भयमुक्त वातावरणात घेतल्या जाव्यात, यासाठी शिवसेना पुढाकार घेईल, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. मालवणात ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत दादागिरी करायची आणि मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत होते. मात्र यापुढे असं काहीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नाही. असे प्रकार केले तर त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते काल दिसले आणि उद्याही दिसेल. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका शांततेच्या मार्गाने होतील. या निवडणुकीत कोणाचाही दबाव राहणार नाही असेही आमदार वैभव नाईक म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!