शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रात जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न

खा. नारायण राणेंची “एक्स”वर पोस्ट ; जबाबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याचे केले आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्रात सध्या जाती जातीत वादविवाद सुरु झाले आहेत. यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी आपल्या ” एक्स” अकाउंट वर पोस्ट करीत “राजकारण थांबवा… सलोखा राखा” असे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रात जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु असून जबाबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन यानिमित्ताने खा. राणे यांनी केले आहे.

खा. नारायण राणे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्‍यातही नव्‍याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्‍याचे पाप करीत आहेत. सर्वसामान्‍यांच्‍या हितासाठी जाती-जातींमध्‍ये संघर्ष निर्माण करीत असल्‍याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्‍ये शेवटी सर्वसामान्‍यांचे बळी जातात व नुकसान होते हे मात्र ते विसरतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रामध्‍ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्‍याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्‍ये लोक गुण्‍यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्‍याचे प्रयत्‍न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्‍ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्‍न करावेत असे मला वाटते.” असे खा. राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3499

Leave a Reply

error: Content is protected !!