पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले संजय नाईक कुटुंबीयांचे सांत्वन

संजय नाईक सरांसोबत चर्चा झालेली विकास कामे पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : ना. चव्हाण

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच तथा वराडकर हायस्कूल कट्टा प्रशालेचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचे नुकतेच अकाली निधन झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण तालुक्यातील पेंडूर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन नाईक कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. 

पालकमंत्री चव्हाण हे मूळ पेंडूर खरारे गावचे सुपुत्र असल्यामुळे अल्पावधीच्या काळात नाईक सर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले होते. पेंडूर गावच्या विकासात्मक कामाबाबत संजय नाईक यांच्याशी चर्चा झाली होती. परंतु  नाईक सर यांच्या अकाली जाण्याने पेंडूर गावात भाजप पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रत्येक वाडीवाडीतील कार्यकर्ता जपणारा असा हा आमचा सहकारी होता. पण नाईक सरांसोबत ज्या कामांबरोबर चर्चा झाली ती कामे निश्चितच पूर्ण करू हीच सरांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. यावेळी भाई सावंत, राजन वराडकर, सचिन आंबेरकर, सरपंच स्नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, शेखर फोंडेकर, माजी सरपंच साबाजी सावंत, सत्यवान पाटील, रविंद्र गावडे, गजानन सावंत, अजित सावंत, संदीप सावंत व अन्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3519

Leave a Reply

error: Content is protected !!