माणसाने इतक्या लहान मनाचे राहू नये ; निलेश राणेंचा वैभव नाईकांना टोला !

मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगावमध्ये प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी स्वखर्चाने या छप्पराची दुरुस्ती करून दिल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. या कृतीवरून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपा आणी निलेश राणे यांच्यावर टीका टिपणी सुरु असून भाजपा कडून देखील त्यावर प्रत्युत्तर दिले जात आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून पोस्ट करीत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

मालवणमध्ये कांदळगावत मी एक शाळा स्वखर्चातून दुरुस्तीला घेतली. त्यात पण उबाठा गटाच्या आमदारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाईट वाटलं. त्यांचं म्हणणं आहे की शाळा पडायच्या अगोदर आपण निधीची तरतूद का केली नाही. काही लोकं डोकं नसल्यासारखे बोलतात, मागचे दहा वर्ष आणि त्यातले साडेसात वर्ष आमदार वैभव नाईक सत्तेत होते, त्यातले उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मग काम का झालं नाही?? इतक्या लहान मनाचे माणसाने राहू नये, लहान विद्यार्थ्यांना आज बसायला जागा नाहीये, तो खर्च कुठूनही आला तो येऊ दे पण तो विद्यार्थ्यांसाठी आहे यात समाधान वाटायला हवं होतं” अशी पोस्ट करून निलेश राणे यांनी वैभव नाईक आणी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3269

Leave a Reply

error: Content is protected !!