मसुरे देऊळवाड्यात “उबाठा” ने केला “उबाठा शिवसेनेत” प्रवेश !

“त्या” कार्यकर्त्यांचा भाजपाशी दुरान्वयेही संबंध नाही ; भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख यासिन शेख यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती काल देण्यात आली होती. मात्र हे कार्यकर्ते भाजपचे नव्हतेच, असा दावा भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख यासिन शेख यांनी केला आहे. आमदारांनी उबाठा कार्यकर्त्यानाच दिलेली आश्वासने न पाळल्याने ते पक्ष सोडून जाणार असे समजताच परत आश्वासन देऊन आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी थांबवलं. त्यामुळे तो पक्षप्रवेश नव्हता. मसुरे देऊळवाडा येथील या कार्यकर्त्यांचा भाजपशी दुरान्वये सुद्धा संबंध नाही, असे श्री. शेख यांनी म्हटले आहे.

मसुरे येथे भाजप पक्ष प्रवेश होणार असल्याचे समजताच वैभव नाईक आणि कंपूच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते असेल उद्योग करू लागलेत. पण भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता कुठेही जाणार नाही. भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात पक्ष अजुन जोमाने वाढत आहे आणि भविष्यात वैभव नाईक यांचं १०० % पतन होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण या आमच्या नेत्यांवर लोकांचा पुर्ण विश्वास असून कोणीही पक्ष सोडून जाणार नाहीत. उलट भाजप मध्ये प्रचंड प्रमाणात इनकमिंग सुरू असून थोडे अवती भवती फिरवण्यासाठी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांना तिकडेच सुखरूप असुदेत, असे यासिन शेख यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!