किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीची साफसफाई करा !

हरी खोबरेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; खा. विनायक राऊत यांचेही लक्ष वेधले

मालवण | कुणाल मांजरेकर

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यास दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होऊनही किल्ल्यावरील तटबंदीची साफसफाई पुरातत्व विभागकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांकडून शासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येते. तरी तटाबंदीच्या स्वच्छतेबाबत पुरातत्व विभागाचे अधिकारी, प्राधिकरण यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन खासदार विनायक राऊत यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी हे देखील उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!