कुडाळ येथील एसीबी कार्यालयावरील मोर्चात समविचारी पक्षांनी सहभागी व्हावे

हरी खोबरेकर यांचे आवाहन ; जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे धाडस शासन दाखविणार का?

मालवण : शिंदे गट आणि भाजपकडून आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात सूडबुद्धीचे राजकारण केले जात आहे. खोट्या तक्रारी करून त्यांना नाहक अडकविण्याचा प्रयत्न केला जात असून या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील एसीबी च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

आमदार नाईक यांच्या विरोधात सूडबुद्धीचे राजकारण सध्या सुरू आहे. अशा खोट्या तक्रारी देऊन चौकशी करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेत विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करण्याचे धाडस शासन दाखविणार का? असा प्रश्नही श्री. खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!