रत्नागिरीत १९ ऑगस्टला भाजपचे ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांची उपस्थिती

रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भाजपा जनसंपर्क कार्यालय, रत्नागिरी येथे ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित समस्या आणि विकासकामांबाबतची निवेदने जाणून घेतली जाणार आहेत.महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभाग संयोजक तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार तसेच संतोष साखरे हे अभियानात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील प्रलंबित कामांची निवेदने घेऊन अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!