… म्हणूनच राणेंच्या वक्तव्या नंतर शिवसेना आक्रमक : रामदास आठवले

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील वक्तव्या वरून त्यांची पाठराखण करताना शिवसेनेला चिमटा काढला आहे.

  नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्याच्या अपमान करण्याचा हेतू नव्हताच. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की राज्याचा विकास होत नाहीय, मुख्यमंत्री न्याय देऊ शकत नाहीय, म्हणून राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे वक्तव्य केल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. हे वक्तव्य का आणि कशाबद्दल केलं याचा खुलासा नारायण राणे स्वतः  करतीलच अस सांगतानाच शिवसेनेत एकनाथ शिंदे नाराज आहेत, शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत याची जाणीव असल्यामुळेच अशा पद्धतीने राणे विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!