वैभवजी, कितीही आटापिटा करा, येणाऱ्या निवडणूकीत तुमचं विसर्जन नक्की !

भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका

कुणाल मांजरेकर

मालवण : आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. वैभव नाईक यांच्या इशाऱ्यावर कठपुतली प्रमाणे वावरणाऱ्या पोलिसांनी कोर्टाचा अवमान केला आहे. मात्र वैभवजी नाईक तुम्ही कितीही आटापिटा करा, कितीही सत्तेचा दुरुपयोग करा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचं विसर्जन नक्की आहे, अशी टीका भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

आ. वैभव नाईक यांना सत्तेचा माज आला आहे. पण लक्षात ठेवा सत्तेचा माज ही जनता उतरवल्या शिवाय राहणार नाही. तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेत कधी तोंड उघडताना या जनतेने पहिले नाही. तुम्ही फक्त आणि फक्त राणेद्वेशाने पछाडलेले आहात. रस्त्यांची दुर्दशा झाली, विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. इथला माणूस रोजगारा पासून वंचित आहे. त्यावर उपाय तुमच्याजवळ नाही. तुम्ही फक्त भावनिक राजकारणाचा आधार घेऊन जनतेला संभ्रमात टाकून पुन्हा आमदार होऊ, या भ्रमात राहू नका, तो भ्रम इथली जनता नक्की दूर करेल, असेही धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!