मोठी बातमी : राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार

मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु होणार असून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!