मुंबई मनपा आपल्याच कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन !

आ. नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र ; महापालिकेसह सत्ताधारी शिवसेनवर टीका

कुणाल मांजरेकर

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपूत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारासह सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. ज्या फ्रंटलाईन वकर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवल करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पुर्ण करता न आल्याची टीका करून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर याचे दोन डोस झालेले नाहीत ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

या पत्रात म्हटलं आहे की, कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निबंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणल. दवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीत फ्रंटलाईन वर्कर, कोविड वॉरिअर्सनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली त्यांच्या नशिबी मात्र आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली. आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलन करावी लागली. सरकार साथ विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकले नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या

ज्या फ्रंटलाईन वकर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाच भांडवल करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पुर्ण करता आलेला नाही. २६ जानेवारीपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर याचे दोन डोस झालेले नाहीत ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जनांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्याच कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोधळच दर्शवते. आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापर कोरोनावर फोडायच आणि फ्रंटलाइन वर्कर्सनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायच अस स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे. हे अत्यंत निदनिय असल्याचंही आ. नितेश राणेंनी म्हटलं आहे.

कालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळात करोनाच्या नवीन व्हेरीअंट बाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे की ही वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल. म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छीतो. जेणेकरून महानगर पालिकेचे फ्रंटलाइन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्याच्या सोबत संधीसाधूपणाच राजकारण तर करत नाही ना? असा सवाल नितेश राणेंनी म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!