विधानसभेचं बिगुल वाजलं ; २० नोव्हेंबरला मतदान

२३ नोव्हेंबरला मतमोजणी : राज्यात आचारसंहिता लागू : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा

सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली असून विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली आहे.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ ते २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबरला छाननी होणार आहे. तर ४ नोव्हें बर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात या निवडणुकीसाठी 9.03 कोटी मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4195

Leave a Reply

error: Content is protected !!