फुलप्रूफ प्लॅन तयार… कितीही बोंबा मारा, रवींद्र चव्हाणच तुम्हाला घरी बसवणार !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची आ. वैभव नाईकांवर जोरदार टीका

दहा वर्षात एकही आमसभा घेऊ न शकलेल्या वैभव नाईकांना पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही 

मालवण | कुणाल मांजरेकर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारावर टीका करणाऱ्या आमदार वैभव नाईकांवर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. दहा वर्षात एकही आमसभा घेऊ न शकलेल्या वैभव नाईकांना पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगून फुलप्रूफ प्लॅन तयार… कितीही बोंबा मारा, रवींद्र चव्हाणच तुम्हाला घरी बसवणार, असे श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे की, वा ..वैभव नाईक वा …तुम्ही १० काय करु शकला नाही त्याची यादी तुम्हीच मिडिया समोर वाचली. आमदार साहेब तूम्ही १० वर्षात एक आमसभा घेऊ शकला नाहीत आणि तुम्ही जनता दरबारावर टीका करता? तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? बरं झालं तुम्हीच समस्यांची यादी वाचली. लोकांना तरी कळलं की तुम्ही १० वर्षात आमदार म्हणुन किती अपयशी आहात. सत्तेतल्या अडीच वर्षात न पुर्ण करु शकलेला एस टी डेपो सोडला, तर तुमच्या कल्पकतेमधील १ काम सांगा जी जनता लक्षात ठेवील. जनतेचा निर्धार पक्का आता आ.वैभव नाईक यांना धक्का. तेव्हा कितीही करा, कितीही बोंबा आता मारा, तुम्हाला रविंद्र चव्हणाच घरी बसवणार. फुल प्रूफ प्लॅन तयार आहे. वाट बघतोय निवडणुकीची. किमान पन्नास हजार च्या फरकाने भाजपा नेते निलेश राणेना विजयी करणारच, असे धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!