बिळवस येथील “त्या” नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आ. वैभव नाईकांनी दिला मदतीचा हात 

शासनाकडून देखील मदत मिळवून देण्याची ग्वाही ; पत्नी सौ. स्नेहा नाईक यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

मालवण | कुणाल मांजरेकर

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शुक्रवारी दुपारी बिळवस येथील शेतकरी चंदू पाताडे यांचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत त्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत शेतकरी चंदू पाताडे यांना सुद्धा सौम्य विजेचा धक्का बसला. ही बाब आमदार वैभव नाईक यांना समजताच त्यांनी शेतकरी चंदू पाताडे यांना आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. तसेच लवकरात लवकर वीज वितरण कडून नुकसान भरपाई मिळून देण्याची ग्वाही दिली. यावेळी सौ. स्नेहा वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सिद्धेश मांजरेकर, आनंद पालव, राहूल सावंत, सचिन पालव, ज्ञानेश फणसे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!