वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी 

भाजपा प्रवक्ते बाबा मोंडकर यांचा सल्ला ; मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला आ. नाईक जबाबदार

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे आमदार वैभव नाईक जबाबदार आहेत. त्यांनी वास्तव स्थितीचे भान राखून बाकी नोंटकी न करता कुडाळ मालवणची अनेक वर्षें प्रलंबित आमसभा घेऊन मतदार संघातील जनतेची माफी मागावी, असा सल्ला भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.

माजी खासदार विनायक राऊत दोन वेळा खासदार झाले. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानणाऱ्या मतदारांमुळेच ! आणि आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील जनतेने ऊबाठा गटाला आणि विनायक राऊत यांना त्यांची योग्य जागा दाखवली आहे. संपूर्ण कोकण महायुतीमय झाला असून येणाऱ्या विधानसभेला यांची पुनरावृत्ती होऊन कुडाळ मालवण विधानसभेत वैभव नाईक यांना पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. या जोडगोळीने स्वतः मतदार संघाच्या विकासासाठी कुठलेही नियोजनबद्ध काम न करता फक्त दहशतवादाचा खोटा बागुलबुवा करून मतदारांना दिशाहीन करून आपला स्वार्थ साधला. वास्तविक पाहता कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ जिल्ह्यातील तीन विधानसभेपेक्षा सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेला मतदार संघ आहे. या मतदार संघाचा सर्वागिण विकास व्हावा या मुख्य उद्धेशाने मतदारांनी बदल म्हणून आमदार वैभव नाईक यांना निवडून दिले. पण आज या मतदार संघात कुडाळ एमआयडीसी ओद्योगिक क्षेत्रात धडपडत आहे. अनेक व्यवसाय बंद आहेत. मच्छिमार समाजाचे पर्सनेट, एलईडी या सारखे प्रश्न प्रलंबित आहेत. पण या समाजाचे हे प्रश्न सोडून अनेक व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत. आंबा, काजू बागायतदार यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी काही काम झाले नाही. कुडाळ मालवणला शालेय मुलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी खेळण्याचे सरकारी मैदान नाही. या मतदार संघातील मालवण, तारकर्ली, वायरी, देवबाग, तोंडवळी सारखे समुद्र किनाऱ्याची ओळख स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यंटन दृष्टया जागतिक पातळीवर पोचविली असताना आजही हॉटेल, होमस्टे, जलक्रीडा व्यावसायिक यांच्या समोर पर्यटन क्षेत्रात अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. परंतु गेल्या दहा वर्षात आमदार वैभव नाईक यांनी यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या किंवा हे विषय मार्गी लावण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. मतदार संघात व्यावसायिक, आर्थिक उन्नतीसाठी कुठलेही नियोजन किंवा प्रयत्न नाहीत. वास्तविक पाहता वैभव नाईक यांचा उदय खासदार नारायण राणेसाहेबांना विरोध करूनच झाला. पण नारायण राणेसाहेब यांनी पंचवीस वर्ष उभ्या केलेल्या कामास अनुसरून तसूभर देखील मतदार संघाचा विकास वैभव नाईक करू शकले नाहीत. मतदार संघाला विकासापासून दूर नेले. एक आमदार म्हणून दहा वर्षांत काय करावे याचाच सूर गमावलेला हा आमदार जनता अनुभवत आहे. वैभव नाईक यांना महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार २०२४ ला योग्य जागा दाखवतील, असे बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!