१२०० लोकं जमवणं म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क भरल्यासारखं ; निलेश राणेंचा टोला

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या गर्दीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. 

काल रत्नागिरी सिंधुदुर्ग महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी इलेक्शन फॉर्म भरला. उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस असे पक्ष मिळून जेमतेम १२०० लोकांनी विनायक राऊत यांना समर्थन दर्शवले आणि एका लहान हॉलमध्ये कार्यक्रम घेऊन विषय संपवला. तसं बघायला गेलं तर हल्ली १२०० लोकं जमवणं म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क भरल्यासारखं काल, अशी पोस्ट निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!