जीजी उपरकर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही ! 

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची प्रतिक्रिया ; आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक 

मालवण : मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही. जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले राजीनामा सत्र ही चांगली बाब असुन हे कार्यकर्ते मनसे पक्षाशी प्रामाणिक कधीच नव्हते. त्यामुळे कधीच पक्षाशी एकनिष्ठ नसलेले कार्यकर्ते राजीनामा देणार असतील तर आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करणार असल्याचे श्री. इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!