महान गावात संग्राम काजू फॅक्टरी नजिक एसटी विनंती थांब्याचा शुभारंभ

मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात संग्राम काजू फॅक्टरी नजिक एसटी महामंडळाच्या विनंती थांब्याचा शुभारंभ सरपंच अक्षय तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या थांब्यासाठी जिल्हा बँक संचालक बाबा परब यांचे विशेष सहकार्य लाभले. हा थांबा मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत.

यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, उपसरपंच अजित राणे, माजी सरपंच मदन घाडी, माजी उपसरपंच सुहास साळुंखे, मंगेश साळसकर, संग्राम साळसकर, रवींद्र साळसकर, ग्रा. पं. सदस्य प्रसाद जाधव, चैताली शिंदे, सागर शिंदे, सोनू शिंदे, अशोक जाधव, नीलकंठ घाडी, दत्ता शिंदे, सुरेश चव्हाण, सुनील हळवे, युवराज नेरकर, तात्या नेरकर, संदीप शिंदे, आदित्य घाडी, ओमकार शिंदे, सुनील पाताडे, वराडकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!