गणेश चतुर्थी कालावधीत वीज कनेक्शने बंद होणार नाहीत !

आ. वैभव नाईक यांच्या मागणीला यश : पालकमंत्र्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना आदेश

मालवण : कोविड काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्याचबरोबर आता गणेश चतुर्थी सणात नागरिकांचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे जर कोणाची वीज बिले थकीत असतील तर गणेश चतुर्थीच्या कालावधीत त्या नागरीकांची वीज कनेक्शने तोडू नये अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.


या मागणीची दखल घेऊन ना. उदय सामंत यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करून गणेश चतुर्थीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची वीज कनेक्शने तोडू नका, असे कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!