चिंदर पं. स. सदस्य तथा भाजपाचे गटनेते दिपक सुर्वे यांचे आव्हान


मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून केलेल्या १४ विकास कामांवरून भाजप शिवसेनेत शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. भाजपचे पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे यांनी दत्ता सामंत यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून १४ विकास कामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गटनेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्यथा दत्ता सामंत यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान दिपक सुर्वे यांनी दिले आहे.
दिपक सुर्वे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे भुमिका मांडली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, ‘खरंतर खोट बोल पण रेटून बोल ही आतापर्यंतची दत्ता सामंत यांची राजकीय नीतीच राहिली आहे. आता चिंदर गावची निवडणूक जवळ आली आहे म्हणून त्यांना आणि त्यांच्या सहकारी यांना चिंदर गावं दिसला. यापूर्वी कधी का नाही दिसला? लोकांना सांगायचं एडव्हांस रस्ते मारतो आणि आणि नंतर आमदार खासदार निधी मिळवायचा हे त्यांचे नेहमीचे काम आहे. चिंदर गाव हे भौगोलिक दृष्ट्या मालवण तालुक्यातील सर्वात मोठं गावं आहे त्यात काही पाणंद राहिल्या त्यातले दोन तीन पाणंद काम केले असेल. बाकी ठेकेदारी घेतलेलेच निकृष्ट कामे परत मारायला भाग पाडली. आता खर्च केलेले पैसे हे आमच्या गावातील निकृष्ट कामातून उरलेल्या पैशातूनच असतील. असे सांगत दिपक सुर्वे म्हणाले, तूर्तास एवढेच सांगतो. बाकी आवश्यकता भासेल तेव्हा अधिक सांगेन असे दिपक सुर्वे यांनी सांगितले.







Subscribe to my channel






