मालवण आगारातून रत्नागिरी, कोल्हापूर मार्गावरही बसफेऱ्या सुरू

आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती

कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले मार्गावरही बसफेऱ्या

मालवण : येथील एसटी आगारातून आजपासून मालवण रत्नागिरी व मालवण कोल्हापूर ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले या मार्गावरही बसफेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.

मालवण रत्नागिरी ही बसफेरी सकाळी साडे आठ वाजता तर कोल्हापूर बसफेरी दुपारी दोन वाजता सुटणार आहे. कुडाळ मार्गावर सकाळी ८, ९, ११, १२, २, ४, ५, ७. ४५ यावेळेत आठ फेऱ्या, कणकवली मार्गावर सकाळी ७, दुपारी ३.३० वाजता, कसाल मार्गावर दुपारी १ वाजता, देवगड मार्गावर सकाळी ७.४५ वाजता, दुपारी १ वाजता, वेंगुर्ले मार्गावर सकाळी ८ वाजता, दुपारी २ वाजता अशा बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. सहा चालक, सहा वाहक सेवेत हजर झाले आहेत तसेच अन्य एक यासह मॅकेनिक, ऑफिस स्टाफ हजर झाले असल्याचे श्री. बोवलेकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!