हरी खोबरेकर आणि कंपूला वैभव नाईक कुठल्या शौर्यावर श्रीकृष्ण वाटतात ?

वैभव नाईक यांना श्रीकृष्ण म्हणणे हास्यास्पद ; ते तर शिखंडी ; चेतन मुसळे यांची टीका

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि कंपूला वैभव नाईक कुठल्या शौर्यावर श्रीकृष्ण वाटतात ? असा सवाल भाजपा युवा मोर्चाचे सुकळवाड विभागीय अध्यक्ष चेतन मुसळे यांनी केला आहे. राणे कुटुंब हे फिनिक्स पक्षासारखे आहेत ते कुठल्याही क्षणी बाजी फिरवू शकतात याची माहिती असल्यानेच हरी खोबरेकर आणि कंपू बिथरला असल्याची टीकाही श्री. मुसळे यांनी केली आहे.

हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेला श्री. मुसळे यांनी उत्तर दिले आहे. निलेशजी राणे प्रत्येक विषयावर आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. त्यामुळे वैभव नाईक यांचा ते राजकीय मुडदा पाडू शकतात, या भयाने नाईक आणि कार्यकर्ते भयभीत झालेले आहेत. निलेश राणे या मतदार संघातील लहान सहान प्रसंगिक गोष्टीला धावून येत असल्यामुळे विरोधक घाबरले असून ते शिखंडी प्रमाणे कटकारस्थान करून विजयाची स्वप्ने पाहत आहेत. प्रश्न राहिला नारायण राणे साहेबांचा तर थोडक्यात सांगायचं तर कहा राजा भोज आणि कहा गंगू तेली ? गोड बोलणे, गोंधळ, महाळ, बारसे आणि लग्नात हजेरी लावणे म्हणजे विकास नव्हे हे आता मतदार संघातील जनतेला समजले असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्यातच जनता या आमदाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे हरी खोबरेकर आणि मंडळींनी समजून घ्यावे, असे चेतन मुसळे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!