आ. वैभव नाईक यांनी घेतली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ; जलजीवन मिशन कामांमधील त्रुटी आणल्या निदर्शनास

प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मान्य

सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी ओरोस येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेऊन जलजीवन मिशन योज़नेच्या कामांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन योज़नेतील एकही काम पूर्ण झालेले नसून कामांमध्ये असलेल्या त्रुटी आ. वैभव नाईक यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. लवकरात लवकर ठेकेदारांकडून सर्व कामे पूर्ण करून घेऊन पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या. त्याचबरोबर जलजीवन मिशनची कामे करताना रस्त्याची साईडपट्टी खोदण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. नागरिकांना याचा त्रास होत असून ठेकेदाराकडून ते सर्व रस्ते सुस्थितीत करून घेण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मान्य केले. 

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, विभागप्रमुख शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, नागेश ओरोसकर, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, रुपेश गरुड, वृषाली गरुड, संजय पारकर,सचिन आचरेकर,रुपेश आमडोस्कर,योगेश तावडे, भगवान परब, रवी कदम, नितीन राऊळ, अनंत पाटकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!