अन्यथा येत्या आठ दिवसात मालवणच्या वीज कार्यालयावर मोर्चा काढणार !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ सह संपूर्ण मालवण तालुक्यात ठिकठिकाणी वीजेच्या समस्या वाढत चाललेल्या असून याकडे वीज वितरण चे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले असून आठ दिवसात ही परिस्थिती न सुधारल्यास मालवणच्या वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे.

मालवणात वीजेच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत वीज वितरण कार्यालयात वारंवार भेट देऊन अगर सूचना करूनही कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. ठिकठिकाणी टान्सफार्मर कमीचे कारण पुढे केले जात आहे. ग्रामस्थांची घरगुती उपकरणे कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नादुरूस्त बनलेली आहेत. वीज वितरणच्या समस्येकडे बघण्यासाठी शासनकर्त्यांना वेळ नाही. मात्र बिले भरण्यासाठी वीज ग्राहकाकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक पावित्रा घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडण्याचा इशारा श्री. खोबरेकर यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!