बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : मागील आठ महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निकालानंतर ट्विटर वरून प्रतिक्रिया दिली आहे. “बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….” असं ट्विट करताना बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील एक व्हिडीओ राज ठाकरे यांनी ट्विट केला आहे.

नाव आणि पैसा… पैसा येतो आणि पैसा जातो, पुन्हा येतो… पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही… ते येऊ शकत नाही… काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही… म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा… असा बाळासाहेबांचा संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!