‘जंतरमंतर’वर आज ‘जालीयनवाला बाग’ हत्याकांडाची आठवण…

भाजप सरकारकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे काम : हरी खोबरेकर यांची टीका 

मालवण : नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी लाखो युवक आज दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकार कडून या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करण्यात आला. भाजप सरकार कडून देशात अराजकता निर्माण करण्याचे कामं सुरु असून आज जंतरमंतरवर दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील जालीयनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.

नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी दोषी असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सोनम वांगचुक हे मागील २२ दिवसांपासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने या उपोषणावरून त्यांना जबरदस्तीने उठवल्यानंतर कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. लोकशाहीनुसार हा या विद्यार्थ्यांचा हक्क असताना या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर आज सकाळीच संसदेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला.शिक्षणासारखा महत्वाचा विषय असून आपलं सरकार देशातील तरुणांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे. सरकार कडून विद्यार्थ्यांची गळचेपी केली जात आहे. हे सर्व पाहून जालीयनवाला बाग हत्याकांडाची आठवण येते. त्यावेळी देखील अनेक युवक मृत्युमुखी पडले. तर आज अनेक युवक जखमी झाले आहेत. या देशात अराजकता निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. या गोष्टीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकारची कोणतीही आत्मीयता दिसून येत नसल्याची टीका हरी खोबरेकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!