९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रुजारिओ पिंटोंच्या “कोकण रडतं” कवितेची निवड 

मालवण : सातारा येथे १ ते ४ जानेवारी येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “कविकट्टा” या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या “कोकण रडतं” कवितेची निवड करण्यात आली आहे. ३ जानेवारीला दुपारी ४ ते ५ यावेळेत ही कविता सादर करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा, शाहूपुरी सातारा आणि मावळा फाउंडेशन, सातारा यांना मिळालेला आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कविकट्टा या काव्यमंचासाठी कविता निवड समितीतर्फे रुजारिओ पिंटो यांनी पाठविलेल्या, कोकण रडतं या कवितेची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!