डोळ्यात मिरचीपूड फेकून २३ लाख लुटीचा तो “बनाव” ; कर्मचारीच निघाले चोरटे

सिंधुदुर्ग जिल्हा हादरणाऱ्या लुटमारीच्या घटनेला वेगळे वळण

वैभववाडी : एटीएम कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून अज्ञातांनी २३ लाख लुटल्याची घटना मंगळवारी घडल्याने जिल्हा हादरला होता. मात्र ही संपूर्ण घटनाच बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या दोन कर्मचाऱ्यांनीच लुटमारीचा बनाव केल्याचे बुधवारी सायंकाळी पोलीस तपासात कबूल केले. दरम्यान, या लूट मारीत आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे फिर्यादी कर्मचारी विठ्ठल खरात व सगुण केरवडेकर यांना घेऊन पोलिस त्यांच्या अन्य साथीदारांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!