चिंदरमध्ये गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची ११ गुरे एका अज्ञात रोगाने दगावली आहेत. यामुळे ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांवर फार मोठे आर्थिक संकट ओढविले असून शेतकरी हवालदील झाले आहेत. तरी ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांवर ओढविलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावेळी संतोष गावकर, देवेंद्र हडकर, राजू परब आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!