निलेश राणेंचा शब्द ; किर्लोस एसटी बस फेरीचा प्रश्न तात्काळ मार्गी

शाळकरी मुलांसह ग्रामस्थांची गैरसोय झाली दूर

मालवण | कुणाल मांजरेकर

कणकवली ते किर्लोस गाडीच्या नियोजित तीन फेर्‍या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. सदरील बाब येथील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या तिन्ही बसफेऱ्या तत्काळ सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

सदरील बाब ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी संपर्क करून कणकवली ते किर्लोस गाडीच्या सर्व फेऱ्या तत्काळ सुरु करण्याची सुचना केली होती.
त्यानुसार बसच्या सर्व फेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. बसच्या फेर्‍या सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी व विद्यार्थी वर्गाने समाधान व्यक्त केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!