मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून छोटा शकील, छोटा राजनला सुपारी !

नारायण राणेंचा गंभीर आरोप : दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख

मुंबई : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी छोटा शकील, छोटा तेली, सुभाष सिंग यांना सुपारी दिली. राणेना मारा म्हणून सांगितले. पण मी सर्वांना पुरून उरलो, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. दिशा सालियन हीचा खून झाला आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे याचा हात होता, असा थेट आरोप करून आता राज्यात आमची सत्ता आहे, या प्रकरणातील आरोपी पकडले जातील, सर्वांची मस्ती उतरवणार, असा थेट इशारा राणेनी दिला आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन प्रकरणात मोठा दावा केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांचा हात असल्यानेच या प्रकरणाची दाबादाबी केली. तशी लोकांची चर्चा आहे. सचिन वाझेंनीच हे संपूर्ण प्रकरण मॅनेज केलं, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला. तुम्ही मुख्यमंत्री असताना सुशांतची हत्या झाली. दिशा सालियनवर अत्याचार करून खून केला. का नाही आरोपींना अटक झाली? त्यात कोण कोण होते ? कोण मंत्री होते ? का वाचवलं त्यांना? वाझेंना खात्यात आणून वाचवलं ना त्यांना? असे सवाल नारायण राणे यांनी केले. लोकं चर्चा करतात आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहेत. त्या अत्याचारात आहेत. आतापर्यंत मी नाव घेत नव्हतो. पण चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहेत. म्हणून लपवालपवी सुरू केली. हे सर्व वाझेंनी मॅनेज केलं. अशी पापं करायला मुख्यमंत्री झाला होता का ? आता उत्तराखंडच्या केसबद्दल सांगता. चुकीचं झालं ते आम्ही लपवणार नाही. पण दिशा सालियन आणि सुशांत सिंगबाबत जे पाप केलं ते तुम्हाला विसरता येणार नाही. आता तुमचं सरकार नाही. त्यामुळे आरोपी पकडले जाणार. मस्ती उतरवणार, असा इशाराच राणे यांनी दिला. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत. ते फार खोटं बोलतात. मी त्यांना लबाड असं नाव ठेवलं आहे. मनोहर जोशींच्या घरावर सदा सरवणकरला हल्ला करायला सांगितला होता. याच उद्धव ठाकरेंनी. हा खोटारडा आणि लबाड माणूस आहे, अशी टीका त्यांनी केली.

मला बाळासाहेबांनी घडवलं. माझ्या रक्तात स्वाभिमान आहे. मला मारण्यासाठी शकीलला सुपारी दिली. छोटा राजनला सुपारी दिली. सुभाष सिंगला दिली. राणेंना मारा म्हणून सांगितलं. मारलं का कुणीय़ आहे का कोणी आता जिवंत. मी पुरुन उरलो सर्वांना. या सुपाऱ्याही काय काम करू शकत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मराठी मराठी या भावनिक वाक्यावर लोकांची मते घेतली. हिंदुत्वाच्या नावावर मते घेतली. हिंदुत्वासाठी यांचा त्याग काय आहे. मराठी माणसासाठी काय केलं? पोटाचा प्रश्न सोडवला का? फक्त लोकांना भावनिक केलं. निवडणूक आल्यावरच सर्व दिसतं. आता त्यांचे पाच आमदार येणार नाहीत. एकही खासदार येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!