जन आशीर्वाद यात्रेत बदल ; भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली ‘ही’ माहिती !

मालवण ( प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा मंगळवारच्या नाट्यमय घडामोडींमुळे खंडीत झाली आहे. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही यात्रा जिल्ह्यात दाखल हीनार असून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. श्री. तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल घडलेल्या अनुचित प्रकारामुळे ना.नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजित कार्यक्रमात थोडासा बदल होत आहे.
ही यात्रा येत्या दोन दिवसात त्याच उत्साहात आणि ठरलेल्या मार्गावरून संपन्न होणार आहे. यात्रेचा सुधारित कार्यक्रम लवकरच कळविणेत येईल, असे राजन तेली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!