कोकणी लोकं कोरोना वाटत फिरतात काय ? “सामना” च्या “त्या” वृत्तावरून निलेश राणे संतप्त
कुणाल मांजरेकर
कोकणातून परतलेल्यानी कोरोनाची भेट आणल्याचं वृत्त आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या “सामना” मधून प्रसिद्ध झालं आहे. यावरून भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. कोकणी लोकं कोरोना वाटत फिरतात काय ? असा सवाल निलेश राणे यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.
मागील वर्षी कोरोना निर्बंधामुळे गणपतीला गावी जाता न आलेले चाकरमानी यंदा झाडून कोकणात दाखल झाले. या चाकरमान्यांनी परत येताना कोरोनाची भेट आणल्याचे वृत्त दै. सामना मध्ये आज प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वृत्ताचे कात्रण ट्विट करून “ही बातमी सामना वृत्तपत्रात आली आहे, ज्या कोकणने शिवसेनेला भरभरून यश दिलं, त्या कोकणासाठी काही दिलं नाही ते सोडा पण हा अपमान कशाला?? कोकणी लोकं कोरोना वाटत फिरतात काय ??” असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.