परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नितेश राणेंचं पहिलंच ट्विट !

कुणाल मांजरेकर

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंनी पहिल्यांदाच एक ट्विट केलं आहे. या ट्विट मधून पुढे येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं त्यांनी एकप्रकारे दाखवून दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदार राणे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी गुरुवारी घेण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना दहा दिवसात त्यांनी जिल्हा न्यायालयात हजर राहून अटकेची व जामीनाची प्रक्रिया पूर्ण करावी, तोपर्यंत आमदार नितेश राणे यांना अटक करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर आमदार नितेश राणे यांनी पहिल्यांदाच ट्विटरवर एक पोस्ट केली आहे.

सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील व्हिडीओ पोस्ट करताना “परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखट” असं या व्हिडीओ च्या माध्यमातून आ. राणेंनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!