जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले ; ५ फेब्रुवारीला मतदान

१६ ते २१ जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होणार

मुंबई – राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. १६ ते २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार १६ जानेवारीला निवडणूक कार्यक्रमाची प्रसिद्धी होणार असून १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. २२ जानेवारीला अर्जांची छाननी होणार असून २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर त्याच्यदिवशी दुपारी ३.३० वा. नंतर निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून चिन्ह वाटप केले जाईल. ५ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ .३० पर्यंत मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला सकाळी १० वा. मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक इव्हीएम मशीन वरच होणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तानी दिली.

error: Content is protected !!