राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; विनायक राऊत यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजच पत्र लिहिणार 

मुख्यमंत्र्यांवर टीका करून राणेंकडून राज्यातील १२ कोटी जनतेचा अपमान 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानास्पद विधान करून राज्यातील १२ कोटी जनतेचा अपमान करण्यात आला आहे. त्याची किंमत राणेंसह भाजपला किंमत चुकवावी लागेल, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या सारखी व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळात असणे दुर्भाग्य असून राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी मी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणेंवर गुन्हा दाखल झालेला असतानाही ते पत्रकारांवर आगपाखड करतात. यातून राणेंचा संयम आता सुटल्याचे स्पष्ट होत असून ते बेभान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर असून वरच्या सरकारच्या जीवावर राणे नंगानाच करत असतील तर पंतप्रधान मोदी हे कधीही सहन करणार नाहीत. राणेंना आता मंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार असून त्यांची मानसीक प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रत्नागिरीच्या वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!