धक्कादायक ! एटीएम कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत २३ लाख लुटले

वैभववाडी : बँक ऑफ इंडियाच्या वैभववाडी शाखेमधील एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांवर अज्ञात तीन जणांनी हल्ला करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्याकडील २३ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे – वैभववाडी मार्गावर घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडीच्या एटीएम मध्ये कॅश डिपॉझिट करणारे सेक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात, संदेश कारीवडेकर हे मोटरसायकल वरून २३ लाख रुपये घेऊन कणकवलीहुन वैभववाडी च्या दिशेने निघाले होते. कणकवलीच्या बँक ऑफ इंडियामधून ३० लाखाची रोकड त्यांनी घेतली. त्यातील ७ लाख रुपये कणकवलीच्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये डिपॉझिट केले. त्यानंतर उर्वरीत २३ लाख रुपये वैभववाडी येथील एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी ते मोटरसायकलने जात होते. कोकीसरे घंगाळेवाडी दरम्यान मागून मोटरसायकलने आलेल्या तिघांनी खरात व कारीवडेकर यांच्या मोटारसायकलवर लाथ मारली. तसेच दोघांच्याही डोळ्यांत मिरची पावडर मारली. यावेळी त्यांच्या ताब्यातील रोख २३ लाख रुपये घेऊन त्यांनी तळेरेच्या दिशेने पोबारा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई वैभववाडी पोलीस ठाण्यात सुरू आहे. जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!